Dayashankar Singh । लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल भाजपवर जातीय आधारावर देशात विभाजन निर्माण केल्याचा आरोप केला, ज्याचा सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी तीव्र निषेध केला. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी,”संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर विरोधकांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले.
राहुल गांधींनी डीएनए मिक्स Dayashankar Singh ।
योगी सरकारचे मंत्री दयाशंकर सिंह वाराणसीत राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. यावेळी बोलताना त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांनी, “राहुल गांधींनी डीएनए मिक्स असून त्यांचे वडील पर्शियन आणि आई ख्रिश्चन आहे, त्यामुळे राहुल गांधी हिंदू झाले आहेत का? पीएम मोदी नव्हे तर संपूर्ण हिंदू समाज संतप्त झाला असे त्यांनी यावेळी म्हटले.
राहुल गांधींची सरकारवर टीका Dayashankar Singh ।
राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आणलेल्या आभार प्रस्तावावर विरोधकांकडून चर्चेला सुरुवात करताना म्हणाले की, हिंदू कधीही हिंसा करू शकत नाही, द्वेष आणि भीती कधीही पसरवू शकत नाही. तरुण, विद्यार्थी, शेतकरी, मजूर, दलित, महिला आणि अल्पसंख्याकांमध्ये भीती निर्माण केल्याचा आरोपही त्यांनी भाजपवर केला. ते म्हणाले की, भाजपचे लोक अल्पसंख्याकांना घाबरवतात आणि त्यांच्या विरोधात द्वेष पसरवतात, मात्र अल्पसंख्याक या देशाच्या पाठीशी खडकासारखे खंबीरपणे उभे आहेत, त्यांनी जगभरात भारताचा गौरव केला आहे आणि ते देशभक्त आहेत.
काँग्रेस नेत्याच्या भाषणादरम्यान, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याव्यतिरिक्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू, पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि भाजप (भारतीय जनता पक्ष) च्या इतर काही नेत्यांनी भाषण केले. या मुद्यांवर स्वतंत्रपणे आक्षेप नोंदवण्यात आला आणि विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला.