Tejashwi Yadav| बिहारमध्ये सातत्याने पूल कोसळण्याच्या घटना समोर आल्या. यावरून बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘अभिनंदन! बिहारमध्ये डबल इंजिन सरकारच्या दुप्पट ताकदीमुळे अवघ्या 9 दिवसांत 5 पूल कोसळले,’ असे म्हणत तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला टोला लगावला.
नेमकं काय म्हणाले तेजस्वी यादव?
बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी पोस्ट करत याचा समाचार घेतला. त्यांनी X खात्यावर पोस्ट करत लिहिले की, “अभिनंदन! बिहारमध्ये डबल इंजिन सरकारच्या दुप्पट ताकदीमुळे अवघ्या नऊ दिवसांत पाच पूल कोसळले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सहा पक्षांच्या डबल इंजिन एनडीए सरकारने नऊ दिवसांत पाच पूल कोसळल्यानंतर बिहारच्या जनतेला मंगलराजच्या कल्याणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. “Tejashwi Yadav|
बधाई हो! बिहार में डबल इंजन सरकार की डबल ताकत से महज 𝟗 दिन में केवल और केवल मात्र 𝟓 पुल ही गिरे है।
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की रहनुमाई और मुख्यमंत्री नीतीश कुमार की अगुवाई में 𝟔 दलों वाली डबल इंजनधारी 𝐍𝐃𝐀 सरकार ने बिहारवासियों को 𝟗 दिन में 𝟓 पुल गिरने पर मंगलराज की… pic.twitter.com/Jj8cVPwKlY
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) June 29, 2024
त्यांनी पुढे लिहिले की, “पूल कोसळल्यामुळे हजारो कोटी रुपयांचे नुकसान होणारे स्वयंघोषित प्रामाणिक लोक याला ‘भ्रष्टाचार’ म्हणत नसून ‘शिष्टाचार’ म्हणत आहेत. विरोधी पक्षांना भ्रष्टाचाराची केशरी प्रमाणपत्रे वाटणारा आणि पक्षपाती पत्रकारितेत पृथ्वी-आकाशाच्या सर्व रँकिंगमध्ये विश्वविजेता म्हणून गोदी मीडियाचे प्रमाणपत्र देणारा सत्यनिष्ठ आणि अविनाशी नेता या सुशासनाच्या कारनाम्यावर तोंड का उघडत नाही?,” असा सवालही त्यांनी केला आहे. Tejashwi Yadav|
दरम्यान, बिहारमध्ये आतापर्यंत चार जिल्ह्यांमध्ये पूल कोसळले आहेत. मधुबनीमध्ये नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने पुलाचा काही भाग कोसळला आहे. राज्यात नऊ दिवसांत आतापर्यंत पाच पूल कोसळले आहेत. ज्यामध्ये अररिया, सिवान, पूर्व चंपारण आणि किशनगंजमधील पुलांचा समावेश आहे. हे सर्व पूल कोट्यावधी खर्चून बांधले जात होते, मात्र कंत्राटदारांच्या दुर्लक्षामुळे पूल पूर्णत: तयार होण्याआधीच कोसळत आहेत. त्यामुळे करोडो रुपयांचे नुकसान होत आहे. त्यावरून आता विरोधक बिहार सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहेत.
हेही वाचा:
मोठी घोषणा..! ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ सुरु करणार