पिंपरी, (प्रतिनधी) – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याकरिता लाखोंचा समाज श्री क्षेत्र अलंकापुरीत दाखल झाला आहे. मात्र, केवळ कागदी नियोजन करणार्या आळंदी नगरपरिषद प्रशासनाला या भाविकांना नागरी सुविधा पुरविण्यात अपयश येत असल्याचे चित्र आहे.
आळमदी गावठाण भागवगळता अन्यठिकाणी अनियोमित पाणीपुरवठा होत ासल्याने भाविकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
तर चर्होली खुर्द रस्त्यावर जिल्हा परिषदेच्या वतीने एकाही पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली नसल्याची भाविक व नागरिकांची तक्रार आहे. हे कमी की काय म्हून ऐन सोहळ्याच्या दिवशी आळंदीच्या काही भागातील वीजपुरवठा दोनदा खंडीत झाल्याने सर्व विभागांचे आषाढीवारीचे नियोजन केवळ कागदावरच असल्याचे चित्र आहे.
आषाढीवारीकरिता जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या देखरेखीखाली आतापर्यंत विविध शासकीय विभागांच्या आढावा बैठका पार पडल्या आहेत. दस्तुरखुद्द जिल्हाधिाकरी सुहास दिवसे यांनीदेखील आळंदीला भेट देत इंद्रायणी नदीघाटासह विविध ठिकाणची पाहणी करत, सूचना केल्या होत्या. सर्वच शासकीय विभागांचे नियोजन वारीदरम्यानचे नियोजन चोख असल्याचे सांगण्यात आले होते.
मात्र, आळंदी नगरपरिषदेच्या वतीने यात्रा काळात केल्या जाणार्या पाणीपुरवठ्याचे नियोजन बिघडल्याचे दिसून आले. आळंदी गावठाण भागात दररोज पाणीपुरवठा केला जाता असताना गावठाणलगतच्या भागात मात्र दोन दिवसांनी होणार्या पाणीपुरवठ्याने नागरिकांसह भाविकदेखील त्रस्त झाल्याचे चित्र पहायला मिळाले.
ढ़वास्तविक पाहता वारीत सहभागी होणार्या प्रत्येक दिंडीकडे स्वत:ची जेवणा खावणाची व पिण्याच्या पाण्याकरिता टँकरची व्यवस्था आहेे. अनेक माणसांचा राबतादेखील आहे. मात्र, आळंदीत दाखल झाल्यानंतर दैनंदिन वापराकरिता पाणी उलब्ध व्हावे, ही माफक अपेक्षादेखील नगरपरिषद पूर्ण करू शकत नसल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा करणारे टँकर वारीकाळात नजरेस पडत नसल्याची नागरिक व भाविकांची तक्रार आहे. परिणामी भाविकांना दिंडीत सहभागी वारकर्यांच्या दैंनंदिन वापराकरिता विकतचे पाणी घेण्याची वेळ आली.
वीजपुरवठा खंडीतच्या तक्रारी
यात्राकाळात अखंडीत वीजपुरवठा करण्याचे नियोजन केल्याची माहिती महावितरण प्रशासनाने आढावा बैठकीत दिली होती.
मात्र, आळंदीतील काही भागासह देहूफाटा परिसरातील वीजपुरवठा यात्राकाळातच खंडीत होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. त्यामुळे आषाढवारीचे नियोजन नेमके कशाकरिता केले जाते? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आळंदी नगरपरिषदेच्या वतीने यात्राकळात सुशोभिकरणावर लाखो रुपये खर्च केला जात आहे. राज्याच्या कानाकोपर्यातून दाखल झालेल्या भाविकांना नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्याऐवजी अन्य बाबींवर होणार्या खर्चाला आमचा आक्षेप आहे.
राज्य सरकारकडून नगरपरिषद प्रशासनाला कोट्यवधी रुपयांचे यात्रा अनुदान मिळत असताना ते खर्च करण्याचा प्राधान्यक्रम नगरपरिषदेने ठरविने गरजेचे आहे. – संदिप नाईकरे, सामाजिक कार्यकर्ते