मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे. इच्छुकांची संख्या अधिक असल्यानं तूर्तास विस्तार होणार नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना व राष्ट्रवादीचे नेते मंत्रिमंडळ विस्तारासाठी आग्रही होते. मात्र भाजपमधून मंत्रिमंडळ विस्ताराला नकार देण्यात आल्याचे समजत आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तार न होण्याची कारणे जाणून घेऊयात…
1) मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास समसमान मंत्रिपदाचे वाटप करण्याची शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी होती.
2) अवघ्या 12 मंत्री पदाचे वाटप करताना प्रत्येकी 4 मंत्री पदे वाट्याला येणार होती.
3) शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत भाजपमधील आमदारांची संख्या अडीच पट अधिक आहे.
4) परिणामी विस्तार झालाच तर भाजपला अंतर्गत नाराजीचा फटका अधिक बसण्याची शक्यता आहे.
5) विस्ताराच्या आशेने अनेक नेते अद्याप पक्षात काम करत असून, त्यांचे नाव न घेतल्यास बंडखोरीची भीती भाजपला अधिक आहे.
उद्यापासून अधिवेशनाची सुरुवात होत. तसेच पुढील महिन्यात निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक आमदार आपापल्या मतदारसंघात राहणे उचित समजतो. परिणामी मंत्रीमंडळाचा विस्तार झालाच तर त्याचा सरकार किंवा जनतेला तितकासा फायदा होणार नाही.