Bridge Collapsed| बिहारमध्ये उद्घाटनापूर्वीच ब्रिज कोसळल्याची घटना घडली. यावरून कामाच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अनेकांनी या घटनेप्रकरणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाला दोषी ठरवले. यावर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
रस्ते वाहतूक आणि हायवे मंत्री गडकरी म्हणाले की, ‘बिहारच्या अरारियामध्ये जो ब्रिज कोसळला आहे तो केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून निर्माण करण्यात आलेला नाही, तर हे काम बिहारच्या ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत सुरु होते.’ 12 कोटी रुपये खर्च करून बनवलेला हा ब्रिज राज्य सरकार बनवत होते, असं गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे.
बिहार के अररिया में दुर्घटनाग्रस्त पुलिया का निर्माण केंद्रीय सड़क परिवहन मंत्रालय के अंतर्गत नहीं हुआ है। बिहार सरकार के ग्रामीण विकास मंत्रालय के अंतर्गत इसका काम चल रहा था।
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) June 18, 2024
ही घटना अररिया जिल्ह्यातील सिक्टीमध्ये घडली. येथे बाकरा नदीच्या पडरिया घाटावर करोडो रुपये खर्चून बांधलेला पूल अचानक नदीत बुडाला. हा अपघात मंगळवारी दुपारी 2:05 च्या सुमारास घडला. 182 मीटर लांबीचा हा पूल तीन भागात बांधण्यात आला होता. त्यातील एक भाग अचानक कोसळला. Bridge Collapsed|
182 मीटर लांबीच्या या पुलाचे बांधकाम 2021 मध्ये सुरू झाले. सुरुवातीला यासाठी 7 कोटी 80 लाख रुपये खर्च आला होता, मात्र नंतर नदीचा मार्ग आणि अप्रोच रोड बदलल्याने एकूण खर्च 12 कोटी रुपये झाला. मात्र पुलाचे कामा झाल्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजूला जाण्यासाठी रस्ते नसल्यामुळे त्यावरून वाहतूक होत नव्हती. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
हेही वाचा:
मुंबईतील 50 हून अधिक रुग्णालये, महाविद्यालये, बीएमसी मुख्यालयात बॉम्बची धमकी, पोलीस यंत्रणेत खळबळ