Ambadas Danve । विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधक विविध मुद्यांवरून आमने-सामने आले. विधान परिषदेत सोमवारी १ जुलैला सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये राडा झाला होता. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर टीका आणि शिवीगाळ केली. असा आरोप भाजप कडून करण्यात येत आहे.
याबाबत भाजप नेते प्रसाद लाड यांनी मीडियाशी बोलतांना दानवे यांनी माझ्याशी बोलताना शिवीगाळ केल्याचं सांगितलं. अंबादास दानवे यांनी सभागृहाची माफी मागावी, आणि अंबादास दानवेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपाकडून करण्यात येत आहे. यावर सभागृहात पुन्हा एकदा आज गोंधळ झाला होता. यानंतर विधानपरिषद परिषदेत अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलबंन करण्यात आले आहे. असा ठरवा विधानपरिषदेत ठराव संमत करण्यात आला आहे.
याच मुद्यावरून भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा अंबादास दानवे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासंदर्भात सभागृहात प्रस्ताव मांडला. यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी निलंबन केलं. तसेच या पाच दिवसांमध्ये अंबादास दानवे यांना सभागृहात येण्यासंही बंदी असेल असंही सांगितलं.