Governor CV Bose And CM Mamata Banerjee| पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील वाद थेट कोलकत्ता उच्च न्यायालयात पोहचला आहे. राज्यपालांनी शुक्रवारी कोलकाता उच्च न्यायालयात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. ममता बॅनर्जी यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल हा खटला दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
सीएम ममता बॅनर्जी यांनी दावा केला होता की, महिलांनी त्यांच्याकडे तक्रार केली होती की राजभवनात होत असलेल्या घटनांमुळे ते तिथे जाण्यास घाबरतात. राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी आदल्या दिवशी ममता बॅनर्जींच्या टिप्पणीवर टीका केली होती. राज्यपाल म्हणाले होते की लोकप्रतिनिधींनी खोट्या आणि बदनामीकारक कल्पना निर्माण करू नयेत अशी अपेक्षा आहे.
राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी शुक्रवारी कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला. राज्यपाल बोस यांनी मुख्यमंत्र्यांच्या पक्षातील टीएमसी नेत्यांवरही गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर कोलकाता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.
दरम्यान, राज्यपालांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. यापूर्वी 2 मे रोजी लोकसभा निवडणुकीदरम्यान राजभवनच्या एका कंत्राटी महिला कर्मचाऱ्याने राज्यपालांवर विनयभंगाचा आरोप केला होता. ममता सरकारने या प्रकरणाचा तपास पोलिसांकडे सोपवला होता. या मुद्द्यावरूनही राज्यात मोठा गदारोळ झाला होता.
हेही वाचा:
महाराष्ट्रात वर्षाला 3 मोफत सिलेंडर कोणत्या कुटुंबांना मिळणार ? जाणून घ्या सविस्तर