वाल्हे,(वार्ताहर) – उगवण क्षमता चांगली राहण्यासाठी व उत्पादन वाढीसाठी बीज प्रक्रिया महत्त्वाची आहे. शेतकर्यांनी दर्जेदार बियाण्यांच्या निवडीबरोबर बीज प्रक्रियेकडे लक्ष द्यावे, बियाणे पेरतात त्यास रासायनिक व जैविक बीज प्रक्रिया करावी, असे आवाहन कृषी सहायक गीता पवार यांनी केले.
वाल्हे (ता. पुरंदर) येथील नवदिशा शेतकरी गट यांना शेतावर कृषी विभागातर्फे तालुका कृषी अधिकारी एस. एस. जाधव, जेजुरी मंडळ कृषी अधिकारी सी. व्ही. धायगुडे, कृषी पर्यवेक्षक जेजुरी 2 पी. डी. प्रमोद खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीजप्रक्रिया मोहीम राबवून गीता पवार यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन केले.
कृषी विभागामार्फत क्षेत्रीयस्तरावर दर वर्षी खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी खरिपातील पिकांच्या बियाण्याची उगवण क्षमता आणि बीजप्रक्रिया या मोहिमा राबविल्या जातात.त्याचाच एक भाग म्हणून वाल्हे येथे ही मोहीम राबविण्यात आली.
यावेळी शेतकरी तुषार भुजबळ, दादासाहेब राऊत, समदास राऊत, मारूती भुजबळ, स्वप्निल भुजबळ, गणेश गिरमे, संदीप भुजबळ, अमित भुजबळ, महेश पवार, विकास भुजबळ, रावसो भुजबळ, पांडूरंग भुजबळ, महावीर दुर्गाडे, उमेश भुजबळ लक्ष्मण दाते आदींसह शेतकरीवर्ग उपस्थित होते.
पेरणीपूर्वी हे करा
सोयाबीन पेरणी करण्यापूर्वी बुरशीनाशक थायरम 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे, त्यानंतर रायझोबियम 250 ग्रॅम 10 किलो बियाण्यास बीजक्रिया करावी असे आवाहन गीता पवार पवार यांनी केले.