Amol Mitkari On Vidhansabha Election । राज्यात आता प्रयेक पक्षाला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्याच्यासाठी प्रत्येक पक्षात जागावाटपाचा फॉर्मुला तयार करण्यावर भर देण्यात येत आहे. अशातच महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी स्वतःसाठी १०० जागांची मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, यावरून अजित पवार गटाकडून जर प्रत्येकाने १०० जागाची मागणी ताणून धरली तर प्रत्येकाला स्वबळावर निवडणूक लढवावी लागेल असा सूचक इशारा देण्यात आलाय.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार )गटाचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी हे विधान केलंय. तसेच महायुती सुरू असलेल्या शाब्दीक वादाच्या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोल सुरू असून तीनही पक्षांच्या नेत्यांची मुंबईत बैठक होणार असल्याची माहितीदेखील मिटकरी यांनी दिली.
…तर प्रत्येकाला निवडणूक वेगळी लढावी लागेल Amol Mitkari On Vidhansabha Election ।
अकोल्यात बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, “महायुतीत जर आम्हाला 55 जागा मिळत असतील तर त्यात आम्ही समाधानी असणार नाही. महायुती आणि महाविकास आघाडीतील तिन्ही महत्त्वाचे पक्ष सध्या 100 जागांवर दावा करत आहेत. महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी 100 जागांची मागणी ताणून धरली तर प्रत्येकाला निवडणूक वेगळी लढावी लागेल”असे सूचक विधान त्यांनी यावेळी केले. आमदार अमोल मिटकरी यांच्या विधानामुळे आता अजित पवार गट विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार का याची चर्चा सुरू झाली आहे. अमोल मिटकरींकडून अकोला जिल्ह्यातील बाळापूर आणि मुर्तीजापूर मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे.
तीनही पक्षाचे नेते भेटणार Amol Mitkari On Vidhansabha Election ।
दरम्यान, सध्या महायुती सुरू असलेल्या शाब्दिक वादाच्या पार्श्वभूमीवर महायुतीत आता ‘डॅमेज कंट्रोल’चे प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी तिन्ही पक्षाच्या समन्वय समितीचे नेते आणि तिन्ही पक्षाचे प्रवक्ते मूंबईत एकत्र भेटणार आहेत. सध्या तिन्ही पक्षांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर सुरू असलेल्या कलगीतुऱ्यावर होणार चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती आमदार अमोल मिटकरी यांनी दिली.
हेही वाचा
लोकसभेनंतर आता विधान परिषदेचा उडणार धूराळा; चार जागांसाठी आज होणार मतदान