Amartya Sen । नोबल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन नुकतेच अमेरिकेतून कोलकाता येथे पोहचले यावेळी त्यांनी भारतात अनेक मुद्द्यांवर भाष्य केल. लोकसभा निवडणुकीचे निकाल हे दर्शवतात की भारत हे ‘हिंदू राष्ट्र’ नाही. असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. तसेच नवीन प्रणाली अंतर्गत लोकांना “चाचणीशिवाय” तुरुंगात टाकल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
अमर्त्य सेन यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका बंगाली वृत्तवाहिनीला बोलत होतो यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘भारत हे हिंदू राष्ट्र नाही, हे निवडणुकीच्या निकालातच दिसून येते. प्रत्येक निवडणुकीनंतर आपण नेहमी बदलाची अपेक्षा करतो. याआधी (भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या काळात) जे काही घडले होते, जसे की लोकांना कोणत्याही खटल्याशिवाय तुरुंगात टाकणे आणि गरीब-श्रीमंत यांच्यातील दरी वाढवणे, ते अजूनही सुरूच आहे. हे थांबायला हवे.’ असेही ते म्हणाले आहे.
भारतातील धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावर बोलतांना ते पुढे म्हणाले,’विशेषत: भारत धर्मनिरपेक्ष देश असताना आणि राज्यघटनाही धर्मनिरपेक्ष असताना राजकीयदृष्ट्या खुल्या विचारांची गरज आहे. भारताला ‘हिंदू राष्ट्र’ बनवण्याची कल्पना मला योग्य वाटत नाही.त्यांच्या मते, नवीन केंद्रीय मंत्रिमंडळ हे ‘पूर्वीच्या मंत्रिमंडळाची प्रत’ आहे. ते म्हणाले की, मंत्र्यांकडे अजूनही तीच खाती आहेत. काही फेरबदल होऊनही राजकीयदृष्ट्या बलाढ्य अजूनही ताकदवान आहेत.’
Amartya Sen । विना खटला तुरुंगात…
अमर्त्य सेन यांनी आठवण करून दिली की ते लहान असताना, ‘जेव्हा भारत ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली होता, तेव्हा कोणत्याही खटल्याशिवाय लोकांना तुरुंगात टाकले जात होते. त्यांनी पुढे सांगितले, मी तरुण होतो तेव्हा माझ्या अनेक काका आणि चुलत भावांना कोणत्याही खटल्याशिवाय तुरुंगात टाकण्यात आले होते. यातून भारत मुक्त होईल, अशी आम्हाला आशा होती. ते थांबले नाही, यासाठी काँग्रेसही दोषी आहे. त्यांनी त्यात कोणतेही बदल केले नाहीत, परंतु सध्याच्या सरकारच्या काळात ते अधिक प्रचलित आहे.
Amartya Sen । ‘भारताची खरी ओळख दुर्लक्षित…’
अयोध्येत राम मंदिर बांधूनही भाजपने फैजाबाद लोकसभा जागा गमावल्याबद्दल सेन म्हणाले की, ‘देशाची खरी ओळख दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. एवढा पैसा खर्च करून राम मंदिर बांधले गेले. भारताला ‘हिंदू राष्ट्र’ म्हणून चित्रित करणे, जे महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या देशात घडले नसावे. हीच भारताची खरी ओळख आहे. याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि हे बदलणे आवश्यक आहे. बेरोजगारी बाबत ते म्हणाले,’भारतात बेरोजगारी वाढत आहे आणि प्राथमिक शिक्षण आणि प्राथमिक आरोग्य यासारख्या क्षेत्रांकडे दुर्लक्ष केले जात आहे.’ असं म्हणत त्यांनी भाजप आणि काँग्रेस पक्षावर आपली प्रतिक्रिया दिली.