Akhilesh Yadav | लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशात भाजपला मोठा फटका बसला आहे. तर इंडिया आघाडीने येथे चांगली कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. लोकसभेच्या सर्वाधिक उत्तर प्रदेश ८० जागा आहेत. त्यातील तब्बल ४३ जागा इंडिया आघाडीने जिंकल्या. समाजवादी पार्टीने आजवरची सर्वोत्तम कामगिरी करताना ३७ जागांवर विजय मिळवला. तर, कॉंग्रेसने ६ जागा हस्तगत केल्या. काँग्रेसच्या मदतीने अखिलेश यादव यांनी भाजपवर उत्तर प्रदेशात मात करत सर्वाधिक जागा इंडिया आघाडीकडे खेचून आणल्या.
यंदाच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाने आघाडीत ६२ जागांवर निवडणूक लढवली. काँग्रेसने १७ जागांवर आणि एक जागेवर तृणमूल काँग्रेसने निवडणूक लढवली. मागील लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने बहुजन समाज पक्षासोबत आघाडी केली होती. मात्र, त्यांना अवघ्या ५ जागांवर विजय मिळाला होता. परंतु यंदाच्या निवडणुकीत अखिलेश यादव यांची कोणती खेळी यशस्वी ठरली. हे जाणून घेऊयात…
तिकीट वाटपाची रणनीती Akhilesh Yadav |
तिकीट वाटपाची रणनीतीने सपाला विजय मिळवून दिला. तसेच ज्या पद्धतीने निवडणूक प्रचार केला गेला. त्यानेही सपाचा कुठेतरी विजय निश्चित केला आहे. भाजपने मोठ्या आणि भव्य रॅलींवर लक्ष केंद्रित केले, तर सपा-काँग्रेसने एकत्रितपणे भव्यतेऐवजी लोक आणि स्थानिक समुदायांपर्यंत पोहोचण्यावर भर दिला.
तिकीट वाटप विचारपूर्वक करण्यात आले. सपाने बिगर यादव ओबीसी उमेदवारांना भरपूर तिकिटे दिली. यादव आणि मुस्लिमांपेक्षा कुर्मी समाजाचे उमेदवार उभे करण्यात आले. अखिलेश यादव यांनी कुटुंबातील केवळ पाच यादव उमेदवारांना तिकीट दिले. तर 27 बिगर यादव ओबीसी, चार ब्राह्मण, दोन ठाकूर, दोन वैश्य,एक खत्री यांच्यासह 11 उच्च जातीय, 4 मुस्लिम उमेदवार आणि 15 दलित उमेदवारांना तिकीट देण्यात आले.
अग्निवीर आणि बेरोजगारीच्या मुद्द्याला प्राधान्य Akhilesh Yadav |
अखिलेश यादव यांनी राम मंदिराच्या लोकार्पणावर कोणतेही भाष्य करणे टाळले. संविधान आणि आरक्षणाच्या मुद्याला त्यांनी प्राधान्य दिले. त्याशिवाय पेपर लीक आणि अग्निवीरच्या मुद्याला प्राधान्य देत बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला. याशिवाय त्यांनी इटावामध्ये एका भव्य मंदिराचे काम सुरू केले. त्यामुळे धार्मिक मुद्यावर घेरणे भाजपला कठीण गेले.
तसेच संविधान आणि आरक्षणाच्या मुद्दयामुळे बसपा आणि भाजपला मानणारा वंचित घटकातील मतदार समाजवादी पक्ष-इंडिया आघाडीकडे वळला. मुस्लिम मतदारही इंडिया आघाडीकडे वळला. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने केलेल्या प्रचाराची दिशा योग्य दिशेने ठेवली. याचा फायदा उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीला झाला.
हेही वाचा: