Akhilesh Yadav on Lok Sabha । समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि कन्नौजचे खासदार अखिलेश यादव यांनी आज लोकसभेत भाषण करताना भाजपवर शेरोशायरीच्या माध्यमातून हल्ला चढवला. “निवडणुकीच्या वेळी 400 पारचा नारा देण्यात आला होता, मात्र मला जनतेचे आभार मानायचे आहेत की त्यांनी लोकशाहीला हुकूमशाही बनण्यापासून रोखले. ” असे म्हणत भाजपवर निशाणा साधला. अखिलेश यादव यांनी पुढे एक कविता वाचून दाखवत,”जनतेने सरकारचा अभिमान मोडला, न्यायालयाला खूप वाईट वाटत आहे. ते भाजपच्या निवडणुकीतील पराभवाचा संदर्भ देत होते.”असे म्हटले.
भाषणाला सुरुवात करताना अखिलेश यांनी अध्यक्ष ओम बिर्ला यांना बोलण्याची परवानगी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, सत्ताधारी आणि विरोधक आपली बाजू मांडत आहेत. सर्व खासदारांचे आणि तुमचे अभिनंदन करायचे आहे. ज्यांनी लोकशाहीला हुकूमशाही बनण्यापासून रोखले त्या मतदारांचेही मला आभार मानायचे आहेत. भाजपने निवडणुकीच्या वेळी दिलेल्या 400 पारचा नारा त्यांनी दिला. असे त्यांनी म्हटले.
अखिलेश यादव यांची काव्य शैली
अखिलेश यादव पुढे कविता वाचून म्हणाले,“आवाम ने तोड़ दिया हुकूमत का गुरूर…दरबार तो लगा है, लेकिन गमगीन हैं सब. दरबार लगा है, लेकिन बेनूर है. पहली बार ऐसा लग रहा है कि हारी हुई सरकार विराजमान है. जनता कह रही है कि सरकार चलने वाली नहीं है. ये गिरने वाली सरकार है. ऊपर से जुड़ा कोई तार नहीं, नीचे कोई आधार नहीं, अधर में है जो अटकी हुई…वो तो कोई सरकार नहीं. पूरा इंडिया समझ गया है कि इंडिया ही प्रो इंडिया है. इस चुनाव में इंडिया की नैतिक जीत है.” असे म्हटले.
४ जून हा जातीय राजकारणाचा अंत: अखिलेश यादव
कन्नौजचे खासदार पुढे बोलताना म्हणाले, “हा पीडीए,इंडियाचा सकारात्मक विजय आहे. सामाजिक न्यायासाठी सुरू असलेल्या मोहिमेचा हा विजय आहे. हा इंडिया आघाडीतील आमच्यासाठी जबाबदारीचा संदेशही आहे. जर 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाच्या इ. औपनिवेशिक राजकारणापासून स्वातंत्र्याचा दिवस होता, त्यामुळे 4 जून 2024 हा दिवस देशातील जातीयवादी राजकारणाचा या निवडणुकीत कायमचा पराभव झाला आहे.
हेही वाचा
उत्तरप्रदेशात भाजपचा बालेकिल्ला का ढासळला? ; आढावा अहवालात पराभवाची 12 कारणे समोर