मुंबई – राज्यातील सर्वात मोठ्या शक्तीपीठ महामार्गला शेतकऱ्यांनी विरोधी केला आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी भूमिहीन होण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे. विरोधकही शेतकरी आंदोलन उरतले आहेत. अशातच आज विधान परिषदेच्या तिसऱ्या कामाकाजावेळी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी करत विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळे विधान परिषदेचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते.
लक्षवेधी क्रमांक 4 मांडताना सतेज पाटील म्हणाले की, 17 देवस्थान जोडण्यासाठीच हा रस्ता तयार करण्यात येत आहे, असं उत्तरात आहे. पण शक्तीपीठ महामार्ग हा रस्ता कंत्राटदारांच्या हितासीठ बांधत आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी म्हटले की, राज्य गतीने पळेल जर असं काम सुरू राहिलं तर पण या रस्त्याला राज्य महामार्ग म्हणून घोषित करण्यात आलं होतं का? 27000 एकर मधून हा महामार्ग जाणार आहे.
याची माहिती 20 दिवसात अधिकाऱ्यांनी काढली तर त्यांचा सत्कार केला पाहिजे. कारण या राज्यात 50 प्रकल्प झाले आहेत. इतकी घाई करून या रस्त्याचे कंत्राट नेमकं कोणाला दिले जाणार आहे? एक महामार्ग अस्तित्वात असताना नवीन महामार्गाची काय गरज आहे? असा प्रश्नांचा भडीमार सतेज पाटील यांनी यावेळी केला.
उत्तर देताना दादा भुसे म्हणाले, या महामार्गाच्या संदर्भात ज्या भावना व्यक्त केल्या आहेत. अनेक आंदोलन झाली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि एसएसआरडीसीच्या वतीने लोकप्रतिनिधी स्थानिकांच्या भावना जाणून पुढची दिशा ठरवली जाईल. जनभावनेच्या विरोधात कुठलेही काम केले जाणार नाही.
सर्वांना विश्वासात घेऊन पुढची पाऊल उचलली जातील. खऱ्या अर्थाने 9 मार्च, 2023 च्या अर्थशंकल्पीय भाषणात याची घोषणा केली होती, असे दादा भुसे यांनी स्पष्ट केले. मात्र समाधानी न झालेले सतेज पाटील पुन्हा शक्तीपीठ महामार्गा रद्द करण्यासाठी आक्रमक झाले. त्यामुळे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केले.