काटेवाडी, (वार्ताहर) – श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर काटेवाडीजवळ रस्त्यांवरील पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये मुरमाऐवजी माती भरल्याने किंवा ही माती वेगळ्या प्रकारचे असल्याने वाहन जाताना मोठ्या प्रमाणात धुरळा उडत असल्याने पाठीमागील वाहन चालवणार्या दू चाकी स्वरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. काटेवाडीत माजी कृषी मंत्री शरद पवार आले असता कार्यकर्त्यांनी फक्त आमची कोणतीही मागणी आपणाकडे नसून हे संथ गतीने सुरू असलेल्या श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करण्यात येण्यासाठी आपण सूचना द्याव्यात अशी विनंती केली आहे. परंतु या रस्त्याचे काम अजूनही अतिशय संथ गतीने सुरू असून आहे.
वाहन चालकांना तारेवरची कसरत करून वाहन चालवावे लागत आहे. वारंवार मागणी करून शेवटी या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मुरमा ऐवजी माती टाकण्यात आली असून प्रत्येक वाहन गेले की त्या वाहनाच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात धुळीचा लोट उसळत आहेत.
ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत त्या ठिकाणी डांबरीकरण करायचे सोडून मुरूम टाकण्याऐवजी माती टाकण्यात आली असल्याने हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. या प्रकारामुळे काटेवाडी परिसरातील नागरिक व वाहन चालकांनी या रस्त्याच्या कामकाजाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे