जाधववाडी (वार्तहर) – चिखलीतून जाधववाडी मार्गे आकुर्डी रेल्वे स्टेशन बस सुरु करावी. अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. चिखलीतून निगडीला जाणारी बस आहे परंतु जाधववाडीतून आकुर्डी – निगडी परिसरात बहुसंख्य विद्यार्थी शाळा कॉलेज करिता घराबाहेर पडतात.
परंतु म्हाळसाकांत व डी. वाय. पाटील. कॉलेज ला जाण्याकरिता खंडोबा माळ ते कॉलेज पर्यंत विद्यार्थ्यांना रोज पायपीट करावी लागते. तसेच निगडी बसने गेल्यास, मधुकर पवळे उड्डाणं पुलापासून कॉलेज पर्यंत पायपीट करावी लागते.
कॉलेज जवळ फक्त आकुर्डी रेल्वे स्टेशन हीच बस जाते, ही बस चिखलीतून जाधववाडी मार्गे सुरु केल्यास अनेक विद्यार्थ्यांची पायपीट थांबेल.
आधीच पाठीवर ओझे आणि त्यात पायपीट यामुळे विद्यार्थीवर्ग त्रस्त आहे. प्रशासनाने जर ही बस सुरु केली तर, याचा फायदा आसपासच्या शाळां व कॉलेज मधील विद्यार्थ्यांना नक्कीच होईल.
विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होईल असे जाणकार नागरिकांचे मत आहे. निगडी बस चिखलीतून देहू आळंदी या रस्त्याने जातं असल्याने शाहू नगर, राजे शिवाजी नगर, पंत नगर सेक्टर १३, जाधववाडी येथील विद्यार्थ्यांची गैरसोयी होते आहे.
तर या मार्गे बस सुरु झाल्यास विद्यार्थ्यांसह, अनेकांची गैरसोय थांबले या मार्गांवर बस लवकरात लवकर सुरु व्हावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.