खालापूर, (वार्ताहर) – मुंबई – पुणे महामार्गावर अष्टविनायकापैकी असलेले महड गावातील श्री वरद विनायकाचे दर्शन घेण्यासाठी खालापूर, चौक, खोपोली, कर्जत, पनवेल, रसायनी व संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भक्त येतात.
अंगारकी चतुर्थी निमित्त मंगळवारी (दि.२५) भाविकांना पहाटेपासून दर्शन घेण्यास गर्दी केली होती. तर, मंदिरात लालबागचा राजाची ही रांगोळी रंगछंद रांगोळी मंडळाच्या कलाकारांनी सारकली होती. ती पाहण्यासाठीही भाविकांनी गर्दी केली होती.
अंगारकी चतुर्थी निमित्त मंदिरात लालबागचा राजा, लोकमान्य टिळक आणि गणपती घडविता मूर्तीकार यांची सुंदर अशी मनमोहक रांगोळी रंगछंद रांगोळी मंडळ अध्यक्ष रोशन पाटील – कसलखंड व त्यांचा सहकाऱयांनी रेखाटली. ही रांगोळी साकारण्यासाठी 20 किलो रांगोळीचा वापर करण्यात आला.
तसेच या रांगोळीसाठी 16 तासांचा कालावधी लागला असून ही रांगोळी 11/22 फुटांमध्ये साकारण्यात आली आहे. यासाठी सप्तरंग अर्थात तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, जांभळा, निळा, पांढरा, लाल आदी रंगाचा वापर करण्यात आला असून त्याचबरोबर 20 कलाकार यांनी एकत्र येऊन ही रांगोळी साकारली आहे.
रोशन पाटील – कसलखंड, योगेश डाकी – कोलेटी, मिताली सुर्वे – बेलापूर, शुभम कुमरे – अंबरनाथ, मधुरा भोईर – शिरवणे, अमोल खानावकर – कानपोली, प्रणिता शिंदे – बीड, स्वप्निल गायकर – चिखले, मयूर हरड – मुरबाड, संकेत पाटील – भिवंडी,
रोहित भोईर – पडघे, हेतल म्हात्रे – चिखले, रवींद्र चौधरी – बारवाई, ज्योती पाटील – खोपोली, मनोहर ठाकूर – चिरनेर, पद्मिनी खाडे – खानावले, यश पाटील – बेलवली, आरती घोरपडे – पुणे, अजित मटकर – अंबरनाथ आदी कलाकारांच्या संकल्पनेतून या रांगोळी साकारली आहे.