मागच्या काही दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी उष्णेतची लाट पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत बहुतेक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला ऑरेंज अलर्ट
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि साताऱ्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. किनारपट्टी भागात पौर्णिमेनंतर उधाण आलं आहे. त्यामुळे समुद्रकिनारी जाऊ नये असं आवाहनदेखील हवामान विभागाकडुन करण्यात आले आहे.