पुणे – आषाढी वारीनिमित्त शहरात येणाऱ्या दिंड्यावेळी वाहतुकीचे योग्य अंमलबजावणी करून अपघात मुक्त वारी संदर्भात नियोजन करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या. पोलीस अधिकाऱ्यांची आढाव बैठक गुरुवारी पोलीस आयुक्तालयात पार पडली. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार या सूचना दिल्या.
शहरात ३० जूनला संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज्यांचा पालख्यांचे आगमन होणार आहे. शहरात पालख्यांचा दोन दिवस मुक्काम असतो. तसेच, शहरात अनेक ठिकाणी दिंड्यासोबत जात असतात. त्यावेळी कुठलाही अपघात होऊ नये यासाठी नियोजन करावे, अशा सूचना यावेळी दिल्या.
ज्या ठिकाणी वारंवार अपघात होऊन वाहन चालकाचा मृत्यू होतो. त्याठिकाणी परत अपघात होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात.
याचबरोबर स्थानिक पोलिसांनी पैदल पेट्रोलिंग करावे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दारूचे हॉटस्पॉट शोधून आरोपीवर भादंवि ३२८ नुसार गुन्हे दाखल करावे. त्या अनुषंगाने आयुक्तांनी सूचना दिल्या आहेत. कॉलेजच्या १०० मीटर मध्ये तंबाकू विक्री करणाऱ्यावर तसेच अवैद्य धंद्यांवर कारवाई करण्याच्या सूचना सुद्धा यावेळी अमितेश कुमार यांनी दिल्या.