Lok Sabha Result 2024 | 17 फेब्रुवारी 2023. निवडणूक आयोगाने आपला फैसला दिला अन् उद्धव ठाकरे यांनी त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गमावले. शिवसेना आता एकनाथ शिंदे यांचा पक्ष झाला होता. त्यावर उद्धव केवळ एक वाक्य बोलले होते. ‘एकदा गद्दारी करणारा नेहमीच गद्दारी करतो’, असे ते म्हणाले होते.
त्यानंतर, 6 फेब्रुवारी 2024 रोजी निवडणूक आयोगाने आपला फैसला सुनावत शरद पवार यांचे बंडखोर पुतणे अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हे चिन्ह दिले. त्यावर शरद पवार म्हणाले, ‘पक्ष स्थापन करणाऱ्याला हाकलून चिन्ह बळकावण्याचा प्रकार यापूर्वी केव्हाच घडला नाही.’
आणि 4 जून 2024, लोकसभा निवडणुकीत उद्धव यांच्या शिवसेनेने 10 जागांवर विजय मिळवला आहे, तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना 6 जागांवर आघाडीवर होती. दुसरीकडे, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 7 जागांवर विजय मिळाला आहे, तर अजित पवार केवळ 1 जागेवर मर्यादित असल्याचे दिसले. विशेष गोष्ट म्हणजे, एक्झिट पोलचे आकडे चुकीचे ठरवत काँग्रेस महाराष्ट्रात सर्वाधिक १२ जागा जिंकली.
महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभी असल्याचे सिद्ध झाले. खरा कोण आणि खोटा कोण हे जनता आपल्या मतांनी ठरवते. उद्धव आणि शरद पवार यांच्याकडे ज्या – ज्या जागा गेल्या, त्यावरून उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी ‘शिवसेना’ आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हीच खरी ‘राष्ट्रवादी’ असल्याचे सिद्ध होते.
दोन्ही सेनांची 13 जागांवर थेट लढत; उद्धव ठाकरेंची बाजी
महाराष्ट्रात लोकसभेच्या 13 जागांवर शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव यांची शिवसेना यांच्यात थेट लढत झाली. त्यापैकी ०७ जागांवर उद्धव ठाकरे गटाने विजय मिळवला तर ६ जागांवर शिंदेंच्या शिवसेनेने सरशी मिळवली. त्यामुळे एकप्रकारे मतदारांनी उद्धव ठाकरे हेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार असल्यावर शिक्कामोर्तब केले.
शिंदेंच्या शिवसेनेने छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, हातकंगले, कल्याण, मावळ, ठाणे या जागांवर तर ठाकरेंच्या शिवसेनेने हिंगोली, मुंबई उत्तर दक्षिण, मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, नाशिक, शिर्डी, यवतमाळ-वाशिम या जागांवर विजय मिळवला.
महाराष्ट्रात महायुतीच्या पराभवाची 5 कारणे
1. मराठा आरक्षणः मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील एक मोठा प्रश्न होता. पण राज्य सरकारला हा प्रश्न योग्यरित्या सोडवण्यात अपयश आले. त्यामुळे मराठा मतदार त्यांच्यावर प्रचंड नाराज होते. एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना ज्यूस देऊन आरक्षणाचे आश्वासन दिले. पण आता जरांगे पुन्हा त्यांच्या विरोधात उपोषणाला बसणार आहेत. यावरून राज्यातील 6 कोटी मराठे त्यांच्यावर नाराज असल्याचे सिद्ध होते.
2. कुटुंब आणि पक्ष विघटनः ज्या पद्धतीने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची 2 शकले झाली, शरद पवारांचे कुटुंब तुटले, त्यामुळे उद्धव ठाकरे आणि 83 वर्षीय शरद पवार यांच्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेमध्ये सहानुभूतीची लाट निर्माण झाली. या लाटेचे मतांमध्ये रूपांतर करण्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यशस्वी ठरले. महाराष्ट्रातील जनताही देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रचंड नाराज होती. पक्ष फोडण्यात त्यांचाच मोठा हात असल्याचे येथील लोकांचे मत आहे.
3. मोदींच्या भाषणांनी खेळ बिघडवला
निवडणूक प्रचारात पीएम मोदी उद्धव यांना उद्देशून म्हणाले- जे उद्धव ठाकरे स्वतःच्या वडिलांचे झाले नाहीत, त्यांच्यावर काय बोलावे. तसेच त्यांनी शरद पवारांचा उल्लेखही भटकता आत्मा म्हणून केला. यामुळे महाराष्ट्रात मोठा वाद झाला. महाराष्ट्रातील जनता संतप्त झाली होती. ज्यामुळे, महाराष्ट्राच्या जनतेला बाहेरच्या व्यक्तीकडून आपल्या नेत्यांचा होणारा अवमान सहन झाला नाही.
4. संतप्त शेतकरी
देशातील सर्वात मोठ्या कांदा उत्पादक राज्यात कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालून मोदी सरकारने शेतकऱ्यांची नाराजी ओढवून घेतली. निवडणुकीच्या शेवटच्या क्षणी त्यांनी बंदी उठवली असली, तरी ही सवलत निवडणुकीपर्यंतच कायम राहील, असे शेतकऱ्यांना वाटत होते. याशिवाय ऊस उत्पादक शेतकरी आणि दूध उत्पादकही रास्त भाव न मिळाल्याने त्यांच्यावर प्रचंड नाराज होते.
5. सत्ताविरोधी लाट
नाशिक, कोल्हापूर, हातकणंगले, जळगावसह महाराष्ट्रात अशा अनेक जागांवरील सत्ता विरोधी लाट शमवण्यासाठी नवे उमेदवार देण्याची भाजपची योजना होती. परंतु त्यांच्या घटक पक्षांनी त्यांच्या या योजनेला हिरवा कंदिल दाखवला नाही. त्यांनी या जागा जबरदस्तीने स्वतःकडे ठेवल्या. अमरावतीसारख्या जागांवर शिवसेनेने (शिंदे) काँग्रेसच्या उमेदवाराला क्रॉस व्होटिंग करून मतदान केले.
काँग्रेसचा सर्वोत्तम स्ट्राईक रेट
2019 मध्ये केवळ 1 जागा जिंकणारा काँग्रेस पक्ष राज्यात १२ जागा जिंकल्या आहेत. यानुसार काँग्रेसचा स्ट्राईक रेट सर्वोत्तम मानला जात आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नावाने आलेल्या सहानुभूतीच्या लाटेचा फायदा महाविकास आघाडीला झाल्याचे मानले जात आहे.