पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १५ मेला मुंबईत भव्य ‘रोड शो’ झाला. अशोक सिल्क मिल परिसराहून मोदींचा रोड-शो पुढे सरकत अडीच किलोमीटर पर्यंत चालला. मोदींच्या रोड-शोला रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी जमली होती. कोळी समाजातील महिलांनी पारंपारिक नृत्य करत मोदींचे स्वागत केले. मोदींनी सर्व नागरिकांना हात करून अभिवादन केले. यावेळी मोदींसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील ओपन जीपमध्ये होते.
दरम्यान या रोड शोवरून आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. नाशिकमधील प्रचारसभेत बोलताना राऊत म्हणाले, ‘ठाकरेंची साथ सोडल्यामुळेच पंतप्रधान मोदी रस्त्यावर आले.’ असेही ते म्हणाले आहे.
सभेत बोलतांना ते पुढे म्हणाले,’मुंबईमध्ये पंतप्रधान मोदी यांचा रोडशो झाला. त्यासाठी संपूर्ण मुंबई बंद करण्यात आली होती. रेल्वे आणि मेट्रोदेखील बंद करण्यात आल्या. गेल्या एक महिन्यात मोदींनी महाराष्ट्रात २८ सभा घेतल्या, याशिवाय आज त्यांचा रोड शोदेखील झाला. खरं तर शिवसेना आणि ठाकरेंची साथ सोडल्यामुळेच मोदींना रस्त्यावर यावं लागले आहे. मोदींनी कितीही सभा घेतल्या तरी हा महाराष्ट्र मोदींच्या पाठिशी उभा राहणार नाही”, अशीही खोचक टीका राऊत यांनी केली.
हे वाचले का ? घाटकोपर घटनेनंतर अमेरिकेतून मुलाची मदतीसाठी आर्तहाक,’आई-वडिलांना शोधा’